text
stringlengths
1
2.66k
त्यातील एकाला आपण आण्विक भौतिकशास्त्राचे प्रणेते सर अर्नेस्ट रुदरफोर्ड म्हणून ओळखतो
तर दुसरे आहेत आयसीएस अधिकारी विल्यम सिन्क्लेयर मॅरिस ज्यांनी 1895 मध्ये आयसीएस परीक्षेत अव्वल स्थान पटकावून ब्रिटीश राजवटीदरम्यान संयुक्त प्रांतातील सहाय्यक दंडाधिकारी म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती आणि त्यानंतर ते भारतीय कौन्सिलचे सदस्य आणि दुरहम विद्यापीठाचे कुलगुरूही झाले
या दोन्ही महान व्यक्ती 189093 या वर्षात न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्च येथील कॅन्टरबरी महाविद्यालयात मित्र होतेत्याच्या शैक्षणिक कारकिर्दीशी संबंधित घटनांनी भविष्यातील विज्ञान आणि भारतीय नागरी प्रशासन यांचे भवितव्य ठरविले
ज्येष्ठ वैज्ञानिक माजी संचालक केमिकल ग्रुप बीएआरसी मुंबई आणि आयआयटी बॉम्बे च्या भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक प्राबीएन
मॅरिस तर स्वतंत्रपूर्व भारतातील आणखी एका सुप्रसिद्ध ब्रिटीश प्रशासक ज्यांचा या कथेशी संबंध आहे ते आहेत जॉर्ज कारमीकल ज्यांनी 1886 मध्ये आयसीएस परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला होता
प्राध्यापकांनी त्यांच्या कथेत उल्लेख केलेले अर्धे पात्र परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे वॉल्टर एम्पसन जे मॅरिस विद्यार्थी असताना न्यूझीलंडमधील वांगानुई महाविद्यालयीन शाळेत प्राचार्य होतेवर्ष 1886 मध्ये जेव्हा एम्पसनचा चुलत भाऊ कार्मिकल आयसीएसमध्ये प्रथम आला तेव्हा त्याने विद्यार्थी दशेतील 13 वर्षीय मॅरिस जो 'विली' म्हणून म्हणून प्रसिद्ध होता त्याला तू भारतीय प्रशासकीय सेवत जा (यू गो फॉर द इंडियन सिव्हिल)असा सल्ला दिलाअखेरीस प्रिन्सिपल एम्पसनने आपला आवडता विद्यार्थी विलीच्या अभ्यासाची योजना आखलीत्यानंतर 1893 मध्ये जेव्हा मॅरिस कॅन्टरबरी महविद्यालयात प्रथम आला तेव्हा त्याचा वर्गमित्र रुदरफोर्डचा दुसरा क्रमांक आला होतामॅरिस प्रथम आला म्हणून त्यालाइंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात जेजे
थॉम्पसन यांच्या हाताखाली संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळालीअखेरीस 1895 मध्ये आयसीएस परीक्षेत अव्वल स्थान मिळविल्यानंतर मॅरिसने प्रतिष्ठित शिष्यवृत्तीवरील आपला दावा सोडला आणि म्हणून ती दुसरा क्रमांक प्राप्त केलेल्या रुदरफोर्डला मिळालीकालांतराने मॅरिस हा एक अत्यंत यशस्वी नागरी सेवा अधिकारी बनला तर रदरफोर्डने भौतिक जगतामध्ये मोठे योगदान दिले आणि आज आपल्याला अणू आणि त्यांचे कार्य याबद्दल असलेली माहित ही त्याचेच योगदान आहे ज्याने मोठ्या संख्येने शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन केले
जे थॉम्पसन यांच्या नेतृत्वात रुदरफोर्डने संशोधन केले नसते ज्याच्या आधारे त्यांनी पुढे संशोधन केले आणि 1908 मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक जिंकलेदुसरा क्रमांक पटकावलेल्या रुदरफोर्ड यांची गणना आतापर्यंतचा सर्वात मोठा शास्त्रज्ञ म्हणून केली जाते आणि सर आयझॅक न्यूटन सारख्या ब्रिटिश महान शास्त्रज्ञाच्या बाजूला वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे त्यांना सन्मानपूर्वक दफन करण्यात आले
जगताप यांनी तरुणांना त्यांच्या स्वप्नांचा व त्यांच्या आवडीच्या क्षेत्राचा पाठपुरावा करण्याचा सल्ला दिलाया कथाकथन सत्रात प्राध्यापकांनी भारतीय नागरी सेवा परीक्षा आणि प्रतिष्ठित नोबेल पुरस्कारांच्या इतिहासावरही प्रकाश टाकलाया संस्थांशी संबंधित काही थोड्या ज्ञात आणि रोचक गोष्टीं त्यांनी अधोरेखित केल्या
जगताप यांनी सांगितले की हे सर्व 1757 मधील प्लासीच्या युद्धापासून सुरू झालेरविंद्रनाथ टागोर यांचे थोरले बंधू सत्येंद्रनाथ टागोर हे 1863 मध्ये आयसीएस परीक्षेत पात्र ठरलेले पहिले भारतीय होते1947 मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशात 322भारतीय आयसीएस अधिकारी आणि 688 ब्रिटीश आयसीएस अधिकारी होते
आदिवासी विकास मंत्रालय आदिवासी आरोग्य आणि पोषण पोर्टल स्वास्थ्य चा शुभारंभ नॅशनल ओवरसीज पोर्टल आणि राष्ट्रीय आदिवासी शिष्यवृत्ती पोर्टल सुरु नवी दिल्‍ली 17 ऑगस्‍ट 2020 आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आज दिल्लीत अनेक उपक्रमांची घोषणा केली यामध्ये आदिवासी आरोग्य आणि पोषण पोर्टल स्वास्थ्य आणि आरोग्य व पोषण विषयक ईवृत्तपत्र आलेख (alekh) तसेच नॅशनल ओवरसीज पोर्टल आणि राष्ट्रीय आदिवासी शिष्यवृत्ती पोर्टल सुरु करणे यांचा समावेश आहे
यावेळी केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा आदिवासी व्यवहार राज्यमंत्री
सर्वांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याला आमच्या पंतप्रधानांनी प्राधान्य दिले आहे
या पोर्टलचे उद्घाटन म्हणजे आपल्या देशातील आदिवासींची सेवा करण्याच्या मोठ्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे
सर्व भागधारकांच्या सहकार्याने मी अशी आशा करतो हे पोर्टल अधिक मजबूत व्हावे आणि आमच्या पंतप्रधानांच्या आरोग्यदायी भारत च्या उद्दिष्टपूर्तीच्या पूर्ततेसाठी अधिक चांगले काम करावे असे अर्जुन मुंडा कार्यक्रमादरम्यान म्हणाले यानंतर त्यांनी going online as leaders (goal) कार्यक्रम या फेसबुक सोबत भागीदारीत सुरु केलेल्या मंत्रालयाच्या उपक्रमाची माहिती दिली
गोल कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशातील 5000 आदिवासी युवकांना मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या समुदायांसाठी ग्रामीण स्तरावरील डिजिटल युवा नेते बनवणे हे मंत्रालयाचे लक्ष्य आहे
ते म्हणाले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करीत आहोत आणि मला आशा आहे की या उपक्रमामुळे आपल्या उद्दीष्टांची पूर्तता होईल आणि परिणामी आदिवासी तरुणांना त्यांच्या कौशल्याच्या क्षेत्रात अग्रगण्य स्त्रोत बनण्यास सक्षम बनविणे आणि नेतृत्व कौशल्य प्राप्त करण्यासाठी त्यांच्या समाजातील समस्या ओळखून त्यांचे निराकरण शोधण्यासाठी आणि त्यांचे ज्ञान समाजाच्या सामाजिकआर्थिक स्थितीसाठी वापरण्यासाठी सक्षम केले जाईल गोल कार्यक्रमास सर्व भागधारकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे
शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबर 2020 रोजी मोबाइल वितरण आणि कार्यक्रमाचा शुभारंभ जाहीर करण्यात आला आहे
kpmg ने सामाजिक समावेशाकडे लक्ष केंद्रीत केलेल्या केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पोर्टलला ईप्रशासनातील एक सर्वोत्तम कार्यपद्धती म्हणून मान्यता दिली आहे या पोर्टलमुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सेवा वितरणात अधिक पारदर्शकताजबाबदारी आणि मूलभूत सुधारणा झाल्या आहेत
रेणुकासिंग सरुता यांनी आलेख (alekh) हे त्रैमासिक ईवृत्तपत्र प्रसिद्ध केले
आदिवासी समाजाच्या आरोग्य आणि कल्याणासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या वचनबद्धतेवर जोर देत त्या म्हणाल्या ज्या व्यक्ती आणि संस्था यांनी समुदायाच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम केले आणि विशेषत कोविड साथीच्या आजाराच्या काळात अनुसूचित जमातीच्या लोकांना जी आरोग्य सुविधा पुरविली त्यासाठी मी त्यांची आभारी आहे * * *
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय सीआयआय सार्वजनिक आरोग्य परिषदेच्या उद्घाटन सत्रात डॉ हर्ष वर्धन यांचे डिजिटल पद्धतीने संबोधन कोविड महामारीने आपल्या देशासाठीबळकट सार्वजनिक आरोग्य संरचना पुन्हा घडवण्याची आणि संरचनात्मक रूपाने त्याचा पुन्हा विचार करण्याची संधी दिल्याचे डॉ हर्ष वर्धन यांचे प्रतिपादन नवी दिल्‍ली 17 ऑगस्‍ट 2020 केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज सीआयआय सार्वजनिक आरोग्य परिषदेच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षपदावरून आभासी पद्धतीने संबोधन केले
ही परिषद दोन दिवस चालणार आहेकेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे आणि नीती आयोगाचे सदस्य( आरोग्य)डॉ विनोद कुमार पॉलही डिजिटल माध्यमातून यात सहभागी झाले
यावेळी आरोग्य विषयक आभासी प्रदर्शन आणि सीआयआय क्षयरोगमुक्त कार्यस्थळे अभियानयाचे उद्घाटन करण्यात आले आणि सीआयआय सार्वजनिक आरोग्य अहवाल जारी करण्यात आला
कोविड महामारीच्या या काळात हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाचे आभार मानतानाच या महामारीने आपल्या देशासाठी बळकट सार्वजनिक आरोग्य संरचना पुन्हा घडवण्याची आणि संरचनात्मक रूपाने त्याचा पुन्हा विचार करण्याची संधी दिली आहे याचे स्मरण त्यांनी प्रेक्षकांना करून दिलेआरोग्य विषयीचा हा अकल्पित धोका नियंत्रणात आणण्यासाठी भारताच्या यशस्वी दृष्टिकोनाचे उदाहरण देत सरकारी योजनांना व्यापक सामाजिक अभियानाचे स्वरूप देण्याच्या देशाच्या क्षमतेची त्यांनी प्रशंसा केलीयातूनच एकेकाळी पोलिओच्या जगभरातल्या रुग्णांपैकी 60 रुग्ण असणाऱ्या भारतात आता पोलिओचे आणि देवीचे संपूर्ण उच्चाटन झाल्याचे त्यांनी सांगितलेयाच प्रमाणे 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत हे पंतप्रधानांचे उद्दिष्टही सीआयआय आणि उद्योग धुरीणांच्या सहाय्याने साध्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
दिल्ली एनसीटीचे आरोग्य मंत्री म्हणून काम करत असताना अल्पनिधीसह मात्र आघाडीच्या उद्योगपतींच्या संपूर्ण सहकार्याने आणि उत्साहाने पोलिओ निर्मुलनासाठी अभियान आयोजित केल्याचा आपल्या अनुभवाची आठवण सांगत देशातून क्षयरोगाचे निर्मुलन करण्यासाठी आपल्याला अशीच कटीबद्धता आणि उत्साह दिसत असल्याचे ते म्हणाले सुमारे 264 लाख क्षय रुग्ण असणाऱ्या भारतात जागतिक क्षय रोगाचे मोठे ओझे असल्याचे त्यांनी क्षयरोग मुक्तकार्य स्थळे अभियानाबाबत बोलताना सांगितले
आयुष्य धनआणि कामाच्या दिवसांचे होणारे नुकसान यासंदर्भात क्षय रोगाचे आर्थिक ओझे मोठे असून अस्वच्छ स्थितीत राहावे लागणाऱ्या आणि कसदार अन्न मिळू न शकणाऱ्या गरिबांच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो
गेल्या पाच वर्षात क्षय रोगा साठीच्या संसाधन निर्धारणात चौपट वाढ झाल्याचे त्यांनी सांगितलेपंतप्रधानांनी 2014 मध्ये सूत्र हाती घेतल्यापासुन क्षयरुग्ण शोधासाठी मोठे सर्वेक्षण सुरु केले आहे
प्रत्येक क्षयरुग्णावर मोफत उपचार केले जात असून त्याचा सर्व खर्च सरकार द्वारे केला जात आहे तसेच क्षयरुग्ण विषयक कळवण्यासाठी डॉक्टरानाही प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले
आयुष्मान भारत योजने मार्फत आरोग्य संरचनेला सरकारने दिलेल्या चालने मुळे काला आजार कुष्ठरोग यासारख्या आजारांचे निर्मुलन होईल तसेचप्रसूतीकाळातला मृत्यू दर शून्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
समाजाच्या तळापर्यंत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठीच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नामुळे ग्रामीण भागात आरोग्य पायाभूत सुविधांचा क्रांतिकारी विस्तार झाल्याबाबत अश्विनी कुमार चौबे यांनी सविस्तर माहिती दिली ई संजीवनी टेली मेडिसिन मंचावर 15 लाख सल्लामसलती नोंदवण्यात आल्या आहेत हे टेली मेडिसिनचा व्यापक उपयोग होत असल्याचे द्योतक आहे असे ते म्हणाले
एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरियासीआयआयचे महा संचालक चंद्रजीत बनर्जीडिजिटल माध्यमातून यावेळी उपस्थित होते * * *
चे 1858 रस्ते आणि 84 पुलांचे काम पूर्ण लडाखमध्ये जुलै 2020 पर्यंत 699 किमी चे 96 रस्ते आणि 2 पुलांचे काम पीएमजीएसवाय अंतर्गत पूर्ण नवी दिल्ली 17 ऑगस्ट 2020 प्रधानमंत्री ग्रामसडक योजना 2001 च्या जनगणनेवर आधारीत दुर्गम भागांना जोडणारी केंद्र सरकारची एक प्रमुख योजना आहे
जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये 250 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेले सर्व भाग या योजनेसाठी पात्र आहेत
जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमध्ये 19277 किलोमीटर लांबीचे 3261 रस्ते आणि 243 पुलांचे काम मंजूर केले आहे त्यापैकी 11517 किलोमीटर लांबीचे 1858 रस्ते आणि 84 पुलाचे काम पूर्ण झाले आहे
तसेच लडाख केंद्रशासित प्रदेशात 1207 किलोमीटर लांबीचे 142 रस्ते आणि 3 पूल मंजूर झाले आहेत त्यापैकी 699 किलोमीटर लांबीच्या 96 रस्ते आणि 2 पुलांचे काम जुलै 2020 पर्यंत पूर्ण झाले आहे
जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात 2149 ठिकाणांच्या जोडणीला मंजूरी मिळाली आहे त्यापैकी 1858 ठिकाणे जोडण्यात आली आहेत
लडाख केंद्रशासित प्रदेशात 65 ठिकाणांच्या जोडणीला मंजूरी देण्यात आली आहे त्यापैकी जुलै 2020 पर्यंत 64 वसाहतींची जोडणी पूर्ण झाली आहे
गेल्या एक वर्षाच्या काळात 1292 किलोमीटर लांबीचे 181 रस्ते आणि 11 पूल 715 कोटी रुपये खर्च करुन निर्माण करण्यात आले आहेत
पुढील दोन उदाहरणे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत (पीएमजीएसवाय) विकासाची उत्तम उदाहरणे आहेत
हा रस्ता लेह जिल्ह्यात प्रथमच प्लास्टीक कचरा वापरुन तयार करण्यात आला आहे
या तंत्रज्ञानात टाकाऊ प्लास्टीकचे तुकडे करुन त्याला गरम पाण्यातून हॉट मिक्समध्ये टाकले जातात
या तंत्रज्ञानामुळे प्लास्टीक कचरा कमी होईल आणि एकूण पाण्याचे शोषण कमी होऊन रस्त्याची बांधणी मजबूत होईल
हा प्रकल्प 201819 मध्ये पीएमजीएसवायएसi टप्पा xii अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे अशा प्रकारच्या बारमाही रस्त्यांमुळे या गावांतील जनतेची सामाजिकआर्थिक स्थिती निश्चित सुधारेल आणि त्यांना शाळा आरोग्य केंद्र आणि बाजारपेठांना जोडता येईल
पर्यटन मंत्रालय पर्यटन मंत्रालयाने देखो अपना देश मालिकेअंतर्गत स्वातंत्र्यदिनाच्या संकल्पनेवर आधारित चौथे वेबिनार जालियनवाला बाग स्वातंत्र्यलढ्यातले एक महत्वपूर्ण वळणचे केले आयोजन नवी दिल्‍ली 17 ऑगस्‍ट 2020 स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या निमित्ताने पर्यटन मंत्रालयाने देखो अपना देश मालिकेअंतर्गत जालियनवाला बाग स्वातंत्र्यलढ्यातले एक महत्वपूर्ण वळण हे एकूण 48 वे आणि स्वातंत्र्यदिनाच्या संकल्पनेवर आधारित चौथे वेबिनार सादर केले
देसाई यांनी जालियनवाला बाग हत्याकांडापूर्वी अमृतसर आणि उर्वरित भारतातील राजकीय व सामाजिक परिस्थिती विशद केली
त्या म्हणाल्या कि जालियनवाला बाग ही एक नापीक जमीन होती जिथे लोक बरेचदा एकत्र भेटायचे तसेच शांततेने निदर्शने करण्यासाठी त्याचा वापर केला जायचा
यामुळे ब्रिटिश नाराज झाले कारण त्यांनी कधीही प्रतिकार झालेला पाहिला नव्हता
सत्यपाल हे अमृतसर शहरातील प्रख्यात राष्ट्रीय नेते होते
त्यांनी रोलेट कायद्याविरोधात सत्याग्रह आयोजित केला
जालियनवाला बागेत झालेल्या शांततापूर्ण मेळाव्यात सर्व पंथातील लोकांनी भाग घेतला
यामुळे ब्रिटीशांमध्ये अनेक गैरसमज पसरले
ब्रिटिश सरकारने डॉ किचलु आणि डॉ सत्यपाल यांना अटक करण्याचे आदेश दिले
त्यांच्या अटकेच्या बातमीने अमृतसरमधील लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली
पंजाबमधील मार्शल लॉ राजवट अतिशय कठोर होती
टपाल सेन्सॉर केले होते
मंदिरे आणि मशिदी सारखी प्रार्थनास्थळे बंद केली होती
ज्यांचे राजकीय संबंध असल्याचा संशय होता अशा लोकांच्या घराचा पाणी आणि वीज पुरवठा खंडित केला गेला
याहूनही सर्वात भीषण होते निवडक बंडखोरांवर सार्वजनिक ठिकणी चाबकाने केलेली मारहाण आणि ज्या ठिकाणी महिला मिशनरीवर हल्ला केला गेला त्या रस्त्यावर सर्व भारतीयांना रांगत जाणे अनिवार्य करण्याचे आदेश
रविवार 13 एप्रिल 1919 रोजी डायरने एखादे मोठे बंड होऊ शकते अशी शक्यता गृहीत धरून सर्व सभांवर बंदी घातली
याबाबतची सूचना व्यापकपणे प्रसारित केली गेली नव्हती आणि अनेक ग्रामस्थ बागेत बैसाखीचा भारतीय उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमले आणि सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलु या दोन राष्ट्रीय नेत्यांना अटक आणि हद्दपार केल्याविरोधात शांतपणे निदर्शने करू लागले
डायर आणि त्याच्या सैन्याने बागेत प्रवेश केला आणि त्यांच्या मागचे मुख्य प्रवेशद्वार रोखून धरले कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता एका उंच जागेवर चढून जवळपास दहा मिनिटे तिथे मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला काही खुली प्रवेशद्वारे होती जिथून लोक बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यावर दारूगोळ्याचा साठा पूर्ण संपेपर्यंत गोळीबार केला गेला
सुमारे 1650 फैरी झाडण्यात आल्या
अनेक तरुण मुले यात मारली गेली आणि फक्त दोन महिलांचे मृतदेह सापडले
तीन महिन्यांनंतर मृत्यूंची मोजदाद करण्यात आली
हे एक प्रचंड हत्याकांड होते आणि 1000 हून अधिक लोक मारले गेले
जखमींना वैद्यकीय सेवेच्या स्वरूपात कोणतीही मदत दिली गेली नव्हती
स्थानिक भारतीय डॉक्टरांनी उपचार केले
रवींद्रनाथ टागोर यांनी निषेध म्हणून 'सरदार '(नाईटहूड ) पदवीचा त्याग केला आणि महात्मा गांधींनी बोअर युद्धाच्या काळात केलेल्या कार्याबद्दल ब्रिटिशांनी दिलेली कैसरएहिंद पदवी नाकारली
चिंगम महिना सुरू झाला आहे त्याच्या सर्वांनाच आणि विशेषत माझ्या मल्याळी बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा येणारे वर्ष हे सर्वांसाठी यश चांगले आरोग्य आणि समृद्धी आणेल अशी मी प्रार्थना करतो असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे
आरोग्य मंत्रालयाची कोविड19 घडामोडींवरील माहिती लक्ष्यकेन्द्री सातत्यपूर्ण आणि केंद्र राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वित प्रयत्नातून भारताने 3 कोटी चाचण्या करत नवा टप्पा पार केला आहे
निदानासाठीच्या प्रयोगशाळांच्या जाळ्याचा विस्तार आणि देशभरात या चाचण्या सहज उपलब्ध होण्याची सुविधा यामुळे चाचण्यांची संख्या वाढण्यासाठी मोठी चालना मिळाली आहे
गेल्या 24 तासात 731697 चाचण्या करत दररोज दहा लाख चाचण्या करण्याची क्षमता प्राप्त करण्याच्या आपल्या निर्धाराच्या दिशेने भारत वाटचाल करत आहे
आज गेल्या 24 तासात देशात कोविड19चे सर्वाधिक 57584 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे
या कामगिरीमुळे देशातील कोविड19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 72 च्या पार पोहोचण्यासाठी प्रोत्साहन मिळाले
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज सीआयआय सार्वजनिक आरोग्य परिषदेच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षपदावरून आभासी पद्धतीने संबोधन केले
ही परिषद दोन दिवस चालणार आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ विनोद कुमार पॉलही डिजिटल माध्यमातून यात सहभागी झाले
15 ऑगस्ट 2020 रोजी सरदार वल्लभभाई पटेलएकात्मिक भारताचे शिल्पकार या विषयावरील सत्राने या वेबिनारचा समारोप झाला
महाराष्ट्र अपडेट्स राज्यातील अंतर्गत जिल्ह्यांमध्ये कोविड रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता राज्य सरकारने 1000 खाटांचे जम्बो रुग्णालय माणकपूर येथे उभारण्याचा निर्णय घेतला आहे
सध्या शासकीय रुग्णालयातील खाटा कमी पडत आहेत त्यामुळे या सुविधेचा पूर्ण विदर्भाला लाभ होईल
राज्यातील 595 लाख रुग्णांपैकी 417 लाख रुग्ण बरे झाले आहेत तर सक्रीय रुग्णांची संख्या 158 लाख एवढी आहे
मनुष्यबळ विकास मंत्रालय उपराष्ट्रपती उद्या नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संस्थांच्या अटल रँकिंग (ariia) 2020 चा निकाल जाहीर करणार रमेश पोखरियाल निशंक आणि संजय शामराव धोत्रे हे देखील कार्यक्रमास उपस्थित राहणारariia हा मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा एक उपक्रम आहे जो भारतातील उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांना नवोन्मेष संबंधी निर्देशकांवर क्रमवारी प्रदान करतोप्रथमच ariia2020 मध्ये केवळ महिलांसाठी असलेल्या उच्च शैक्षणिक संस्थांसाठी विशेष बक्षीस श्रेणी नवी दिल्‍ली 17 ऑगस्‍ट 2020 उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू उद्या 18 ऑगस्ट 2020 रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय शामराव धोत्रे यांच्या उपस्थिती मध्ये नाविन्यपूर्ण कामगिरीवरील संस्थाची अटल क्रमवारी (एआरआयआयए) 2020 चा निकाल जाहीर करणार आहेत
आभासी पद्धतीने हे निकाल जाहीर केले जातील आणि उच्च शिक्षण सचिव अमित खरे आणि सरकारी अशासकीय आणि उच्च शिक्षण संस्थांचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील
एआरआयआयए हा मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा उपक्रम असून विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये नवोन्मेष स्टार्टअप आणि उद्योजकता विकासाशी संबंधित निर्देशकांवर भारतातील उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांना योग्य क्रमवारी प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारच्या एआईसीटीई आणि मंत्रालयाच्या नवोन्मेष विभागाद्वारे या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाते
एआयसीटीईचा विश्वास आहे की येत्या काही वर्षांत मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या दिशेने सुरु केलेल्या उपक्रमांमुळे भारत जागतिक नवोन्मेषावर सकारात्मक प्रभाव पाडेल
ते पुढे म्हणाले की एआरआयआयए शिक्षण संस्थांमधून प्राप्त होणाऱ्या नवकल्पनांच्या गुणवत्तेवर आणि परिमाणावर लक्ष केंद्रित करते आणि या नवकल्पनांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण केलेल्या वास्तविक परिणामाचे मोजमाप करते
एआरआयआयए मूल्यांकन समितीचे अध्यक्ष बीव्हीआर मोहन रेड्डी यांच्या मते नवीन भारत बदलत आहे आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देऊन शिक्षण संस्था या बदलामध्ये सहभागी होत आहेत
एआरआयआयए ही एक रचना आहे जी आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये होत असलेल्या या बदलाचे मोजमाप करते
एआरआयआय क्रमवारी भारतीय संस्थांना निश्चितच प्रेरणा प्रदान करेल आणि त्यांच्यात विचारप्रवर्तन घडवून भारतातील उच्च प्रतीचे संशोधन नवोन्मेष आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी एक परिसंस्था तयार करेल
मागील वर्षी एआरआयए 2019 दरम्यान 'सार्वजनिक अर्थसहाय्य' मधील अव्वल 10 संस्था आणि 'खाजगी व स्ववित्त' श्रेणीतील 5 संस्था जाहीर करण्यात आल्या आणि सर्वोच्च स्थान प्राप्त केलेल्या संस्थांचा 8 एप्रिल 2019 रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे सन्मान करण्यात आला
माहिती आणि प्रसारण मंत्रालय आयआयएमसीचा 56 वा स्थापना दिवस साजरा स्थापना दिनाच्या कार्यक्रमात माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांचे प्रमुख भाषणमाध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसायाभिमुख प्रशिक्षणाची गरजअमित खरे नवी दिल्‍ली 17 ऑगस्‍ट 2020 भारतीय जनसंवाद संस्था आय आय एम सी चा 56 वा स्थापना दिवस आज साजरा झाला
यानिमित्त संस्थेच्या देशभरातील प्रादेशिक केंद्रांमध्ये तसेच दिल्लीतील मुख्यालयातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते
यावेळी खरे यांनीराष्ट्रीय शिक्षण धोरण तत्वज्ञान आणि मार्गदर्शक तत्वेतसेच या धोरणात देशातील जनसंवाद शिक्षणक्षेत्रासाठी असलेल्या संधी आणि वैशिष्ट्ये या विषयावर मार्गदर्शन केले
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने आयआयएमसीनेही केंद्र आणि राज्यांच्या अखत्यारीतील विविध विद्यापीठांशी चर्चा करत पत्रकारिता आणि जनसंवाद या क्षेत्रातील अभ्यासक्रमांचा आढावा घेण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी सूचना खरे यांनी केली
तंत्रज्ञानप्रेरित शिक्षणावर भर देत त्यांनी पत्रकारिता आणि जनसंवाद क्षेत्रातील उदयोन्मुख विषयांचे ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करावेत असा सल्ला दिला
संशोधन आणि प्रशिक्षण यासाठी आय आय एम सी ने आय सी एस एस आर आणि जे एन यु अशा संस्थांशी समन्वयाने काम करावे अशी सूचनाही त्यांनी केली
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयआयएमसी चे महासंचालक प्राध्यापक संजय द्विवेदी यांनी केले तर अतिरिक्त महासंचालक के सतीश नम्बुद्रीपाद यांनी मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानले
अर्थ मंत्रालय वाढत्या मागण्या लक्षात घेऊन अधिक लवचिकतेसह आंशिक पत हमी योजनेचा (पीसीजीएस) 20 चा अवधी वाढवण्यात आला नवी दिल्‍ली 17 ऑगस्‍ट 2020 केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानाचा भाग म्हणून 20052020 ला आंशिक पत हमी योजना (पीसीजीएस) 20 सुरु करण्यात आली
सहा महिन्या नंतर19112020 पर्यंत हमी अमलात येण्यासाठी प्रत्यक्ष वितरीत रकमेच्या आधारावर पोर्टफोलीओला निश्चित स्वरूप देण्यात येईल