text
stringlengths
1
2.66k
प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे संस्थापक दादा लेखराजजी यांनी ज्या विचाराला संस्थात्मक रूप दिले आणि स्त्री शक्तीच्या माध्यमातून हा विचार पुढे नेला त्या आंदोलनाला आज 80 वर्षे होत आहेत यामुळे दादा लेखराजजी यांच्या आत्म्याला नक्कीच शांती लाभत असेल
आपल्या देशात 80 वर्षाचे विशेष महत्व मानले जाते
जगात 25 वर्षे 50 वर्षे 75 वर्षे 100 वर्षे यांचे महत्व मानले जाते मात्र भारतात 80 वर्षांना विशेष महत्व आहे
80 वर्षाच्या प्रवासात त्या व्यक्ती किंवा संस्थेला एक हजार पूर्ण चंद्राचे दर्शन घडलेले असते
आज ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय दादा लेखराजजी यांच्या प्रयत्नातून सुरु झालेले ब्रम्हकुमारी आंदोलन सहस्त्र चंद्र दर्शन समयातून संपूर्ण मानवजातीला शीतलता प्रदान करण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला नवी ऊर्जा घेऊन पुढे वाटचाल करेल
गेल्या वर्षी दादी जानकीजी यांनी शताब्दी पूर्ण केली त्या एकशे एक वर्षाच्या आहेत आणि आजही एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे आपणा सर्वाना आशीर्वाद देत आहेत
मी इथूनच दादीजींना प्रणाम करतो
दोन दिवसांनी चेटी चंद पर्व साजरे केले जाईल संपूर्ण हिंदुस्तानमध्ये संवत्सर समय असतो
मी आपणा सर्वाना नव संवत्सर चेटी चंदच्या खूपखूप शुभेच्छा देतो
आपणा सर्वाना भेटण्याची संधी मला काही वेळा लाभली आहे आपणा सर्वांचा माझ्यावर अपार स्नेह राहिला आहे
उच्च विचार आचरणाऱ्या संस्थापकाच्या जीवनात 80 वर्षे हा काळ कमी नव्हे
आज जगातल्या परिस्थितीकडे पाहता मानवी स्वभाव लक्षात घेता कोणतीही संघटना किंवा व्यवस्था 10 वर्षे15 वर्षे 20 वर्षानंतर विखरायला सुरवात होते गट बनू लागतात एकातून दहा संस्था निर्माण होतात
दादा लेखराजजी यांची कमाल आहे की त्यांनी जी मूल्ये जे आदर्श ठेवून ब्रम्ह कुमारी विश्वविद्यालय ब्रह्म कुमारी आंदोलन चालवले स्त्री शक्तीला प्राधान्य देऊन चालवले 80 वर्षांनंतरही आज त्याच मानसिकतेने तितक्याच प्रखरतेने त्याच एकजुटीनेत्यांचा संदेश जगभरात पोहचवला जात आहे लाखो कार्यकर्त्यांची साखळी तयार केली आहे
ब्रम्हकुमार ब्रम्हकुमारी भारताचा आध्यात्मिक संदेश जगभरात पोहोचवत आहेत
आपणा सर्वांचे अभिनंदन
आपणा सर्वाना भेटण्याची संधी मला काही वेळा मिळाली आहे
सध्या कामाची व्यग्रता जास्त असते वेळेच्या समस्येमुळे मी आपणा सर्वाना प्रत्यक्ष भेटू शकत नाही मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपणा सर्वांचे दर्शन मला लाभले
प्रकाशाच्या माध्यमातून आपण सर्वानी अभिवादन केले आणि मी आपणा सर्वाना टीव्हीवर पाहत आहे दादा लेखराज आणि दादीजींच्या नेतृत्वाखाली अवघ्या जगात ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचा प्रयत्न करत आहात
आपण अशा एका देशाचे प्रतिनिधी आहोत अशा देशाचे पुत्र आहोत ज्यालाआपले विचार दुसऱ्यावर लादणे आवडत नाही
ब्रम्हकुमारी माध्यमातून हा निरंतर प्रयत्न सुरु आहे आणि भारताचे हे वैशिष्ट्य आहे
ईश्वर एक आहे हे या देशाने सर्वाना सांगितले आहे
हिंदूंचा देव वेगळा मुसलमानांचा देव वेगळा ख्रिश्चनांचा देव वेगळा पारश्यांचा देव वेगळा ही आमची शिकवण नव्हे आणि म्हणूनच आमच्या शास्त्रांनी वेदकाळापासून आम्हाला हेच शिकवले एकमसत विप्रा बहुधा वदन्ति सत्य एकच आहे ऋषी मुनी ते वेगवेगळ्या मार्गाने सांगतात
वेगवेगळे लोक वेगवेगळ्या रूपाने व्याख्या करतात मात्र सत्याप्रती आपल्या दृष्टीकोनाची भावना तीच आहे
शांतिवनात आपण सौर प्रकल्प सुरु केला आहे असे मला समजले
शांतिवनाशी निगडित रुग्णालय पाहण्याची संधी मागे मला मिळाली होती गरीबांची सेवा कशी केली जाते हे मी प्रत्यक्ष पाहिले होते
सौर ऊर्जेसाठी आपण इतके कार्य करत आहात अबू रोडवर असलेले केंद्र सौर उर्जेवर चालवण्याचा निर्णय आपण काही वर्षांपूर्वी घेतला होता जेव्हा जागतिक तापमान वाढीची एवढी चर्चाही नव्हती तेव्हा आपण हा निर्णय घेतला होता दूर दृष्टीने आपण काम करता हे यातून प्रतीत होत आहे
आपल्या मार्गदर्शनाखाली देशात ऊर्जा क्रांती येत आहे मानवी जीवनात ऊर्जा क्रांती येत आहे
निसर्गामध्ये सौर ऊर्जेचे जेवढे महत्व आहे तेवढेच व्यक्तित्वामध्ये शौर्य व ऊर्जेचे महत्व आहे आणि जिथे तेज आहे सामर्थ्य आहे संकल्प आहे तिथे व्यक्तित्व नवी शिखरे पार करु शकते
अबू सारख्या ठिकाणी 3 मेगा वॅट सौर ऊर्जा हा प्रयत्न खूप प्रेरक ठरेल असा मला विश्वास आहे
शेजारी गुजरातमध्ये मोठा पुढाकार घेतला गेला
देशात सौर ऊर्जेबाबत वेगळा दृष्टिकोन ठेवण्यासाठी सर्व राज्यातल्या सरकारांना प्रेरणा मिळाली
गुजरात सरकारचा प्रयत्न सफल ठरला
आज शांतीवनही सौर ऊर्जेशी जोडले जात आहे हे निसर्ग संरक्षणाचे काम आहे
शांतिवनात सौर प्रकल्पाद्वारेएका दिवसात 38 हजारहून जास्त लोकांचे जेवण बनवणे शक्य आहे
निसर्ग संरक्षणासाठी आपण केवढे मोठे कार्य करत आहात
सौर कंदील घरासाठी सौर प्रकाश यंत्रणा सौर चूल घरोघरी पोहचवण्याची मोहीमही आपण हाती घेतली आहे
समाजात मोठा बदल घडवण्याचा प्रयत्न आपणाकडून होत आहे
केवळ आध्यात्मिकच नव्हे तर निसर्गाच्या सानिध्याने गरिबातल्या गरीब व्यक्तीच्या जीवनात कसा बदल घडवता येईल या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत
जागतिक तापमान वाढ या संकटाचा मुकाबला जग करत आहे त्यासाठी भारत कशी मदत करू शकेल यादृष्टीने भारताने संकल्प केला आहे की 2030 पर्यंत म्हणजे 13 वर्षात देशाच्या ऊर्जेच्या एकूण गरजेपैकी 40 टक्के ऊर्जेची पूर्तता नवीकरणीय उर्जेपासूनच करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे
सरकार समाज संस्था ज्याप्रमाणे आपण 3 मेगावॅट घेऊन आला आहात त्याप्रमाणे या सर्वानी या ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग केल्यास मानव जातीचीनिसर्गाची परमात्म्याची मोठी सेवा घडेल
अशाच प्रकारे आपण वृक्षांसाठी काम करत आहात आपल्याकडे वृक्षांना परमात्मा मानले गेले आहे
हरित क्रांती दुग्ध क्रांती ऊर्जा क्रांती अशा निसर्ग संरक्षणाबरोबरच मानवी जीवनाला नवी दिशा देणाऱ्या क्षेत्रात आपण कार्यरत आहात
ऊर्जा बचतीसाठी भारत सरकारने एलईडी ब्लबचा कार्यक्रम हाती घेतला आहे ही माहिती आपण घरोघरी पोहोचवाल
नगर पालिकेत महानगरपालिकेत लोकांच्या घराघरात सुमारे 22 कोटी एलईडी लावण्यात आले आहेत त्यामुळे जवळपास 11 हजार कोटी रुपयांची बचत होत आहे
ब्रम्हकुमारीची 8500 केंद्रे आहेत
सौर ऊर्जेद्वारा आपण एक नवी दिशा दिलीत त्याप्रमाणे एलईडी बल्‍बसाठी ब्रम्हकुमार ब्रम्हकुमारी देशात जागृती करू शकतात
यामुळे ऊर्जेची बचत होईल गरीब माणसाचे पैसे वाचतील महापालिकांचे पैसे वाचतील हे पैसे दुसऱ्या कामासाठी उपयोगात आणता येतील
एके काळी 400 500 रुपयांना विकला जाणारा एलईडी आज 50 60 रुपयांना मिळत आहे
ब्रम्हकुमारी द्वारे समाजासाठी केल्या जाणाऱ्या कामात या कामाची जोड दिली जाऊ शकते
आज आपण आयात केलेल्या पेट्रोल डिझेलवर अवलंबून आहोत
आपण जर पवन ऊर्जा जल ऊर्जा सौर ऊर्जा यावर भर दिला तर पेट्रोलियमसाठी एवढे पैसे खर्च करावे लागतात कोट्यवधी रुपये लागतात त्याची बचत होईल आणि हिंदुस्तानमधल्या गरिबांसाठी त्याचा उपयोग करता येईल त्या दृष्टीने आपले योगदान म्हणजे योग्य दिशेने चाललेले काम आहे
यासाठी आपण अभिनंदनास पात्र आहात
निसर्गाचे शोषण करू नये असेच आपल्या शास्त्रात म्हटले आहे निसर्गाचे शोषण हा आपल्याकडे गुन्हा मानला गेला आहे
निसर्गाकडून योग्य रीतीने आपण घ्यायला हवे आणि याबाबत काम करण्यासाठी आपले प्रयत्न नक्कीच उपयुक्त ठरतील
ब्रह्मकुमारी संस्थेचा मंत्र 'एक ईश्वर एक विश्व परिवार' हे आपल्या देशाचे मूळ चिंतन आहे
'वसुधैव कुटुम्बमकम' हा इतका विशाल व्यापक आणि चिरंतन विचार याच भूमीने दिला आहे
वेळो वेळी त्याची अभिव्यक्ती वेगळी असेल भाषा वेगळी असेल पण विचार तोच असेल म्हणूनच भारत जगात न्याय समृद्धी साठी प्रयत्नशील राहिला आहे
भारताच्या प्रयत्नातूनच आज जगभरात आंतरराष्ट्रीय सौर युतीच्या माध्यमातून निसर्ग रक्षणासाठी मोहीम सुरु आहे जगातले आणखी देशही यामध्ये सहभागी होत आहेत
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्यांनी जी स्वप्ने बाळगली होती ती पूर्ण करण्यासाठी काही करण्याची आपली सर्वांची जबाबदारी नाही कासामूहिक रूपाने करण्याची संकल्प करून करण्याची योग्य दिशेने करण्याची आपली जबाबदारी नाही का
जगातली एवढी मोठी लोकसंख्या आपल्या जीवनात बदल घडवते तेव्हा विश्व कल्याणासाठी मोठा आधार ठरू शकतो
आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने जमला आहात 2022 पर्यंत ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या माध्यमातून ब्रम्हकुमार आणि ब्रह्मकुमारी यांच्या माध्यमातून भारतातल्या आठ हजारहून जास्त शाखांच्या माध्यमातून दोन तीन पाच सात आपल्याला योग्य वाटेल तितके संकल्प घ्या
भारतात ज्याप्रमाणे हे कार्य घडते आहे त्यात आपणही नवा जोम भराल असा मला विश्वास आहे
गेल्या काही दिवसात आपण पाहिले असेल नोटाबंदीनंतर भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधातल्या निर्णायक लढ्याच्या दिशेने आपण आगेकूच करत आहोत
देश पुन्हा काळ्या पैश्याच्या दिशेने जाऊ नये यासाठी डिजिटल तंत्रज्ञान मोठे काम करू शकते
रोखीचा व्यवहार जेवढा कमी होईल डिजिटल चलनाचा जेवढा जास्त उपयोग होईल तेव्हा देशात आपण स्वच्छ व्यवस्था विकसित करू शकू
सर्व ब्रम्हकुमार आणि ब्रम्हकुमारी आपल्या मोबाईलवर भीम अँप डाउनलोड करून छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना डिजिटल देवाण घेवाणीसाठी रोख रहित व्यवहारांच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न करू शकतात का
मी आज आपल्यासमवेत आहे भलेही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आलो असेन मात्र माझे एवढे नाते नक्कीच आहे की मी आपल्याला हक्काने सांगू शकेन की ब्रम्हकुमारींद्वारे या कामावर भर दिला जावा आणि देशात परिवर्तनाच्या सूत्रधाराच्या रूपात आपली इतकी मोठी संस्कारित मनुष्य शक्ती उपयोगात यावी
ब्रह्मकुमारी आंदोलनात ब्रम्हाकुमार आहेतच पण ब्रह्मकुमारी खूप सक्रिय आहेत
आपल्या देशात आजही लाखो बालके लसीकरणापासून वंचित आहेत
यामुळे कोणत्या ना कोणत्या गंभीर आजाराला ही बालके बळी पडतात
माता मृत्यूदर शिशु मृत्यूदर हे चिंतेचे विषय आहेत
इंद्रधनुष्य योजनेअंतर्गत भारत सरकार घरा घरासाठी एक जबाबदारी निश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे
लसीकरण कार्यक्रम असेल तेव्हा आमचे ब्रह्माकुमार आणि ब्रह्मकुमारी यांनी एक स्वयंसेवक म्हणून त्याच्याशी बांधील राहावे लहानलहान मुलांचे आयुष्य वाचवण्यासाठी उपयोगी पडावे केवढी मोठी सेवा होईल
आपण हे मोठे काम करू शकता
मी आणखी एका कार्यक्रमासाठी आपल्याकडे आग्रह धरतो ब्रह्मकुमारी विश्व विद्यालय असा ऑनलाईन कोर्स सुरु करू शकते का ज्याद्वारे हिंदुस्तानच्या जनतेला ऑनलाईन परीक्षेसाठी प्रेरित करता येईल शिक्षित करता येईलपरीक्षा घेता येईल प्रमाणपत्र कोर्स करता येईल आणि माझ्या मनात यासाठी विषय आहे पोषणपोषणाबाबत आपल्याकडे अज्ञान आहेवयानुसार आहार कसा असावा शरीराला कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते या ज्ञानाचा अभाव आहे
ज्यांची आर्थिक स्थिती ठीक आहे दोनवेळा चांगले खाणे खाऊ शकतात त्यांनाही काय खायचे कसे खायचेकाय खायचे नाहीयाविषयी माहित नसतेशरीराला पोषणासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते कोणत्या गोष्टी नसल्यास शरीराला हानी होऊ शकते याबाबत ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम ऑनलाईन प्रशिक्षण ऑनलाईन परीक्षा घेऊन ही मोहीम उभारू शकते का
हिंदुस्तानची सर्व विद्यापीठे आपल्याबरोबर जोडता येऊ शकतात का
आपल्या संघटनेत महिलांची संख्या भरपूर आहे
आणि महिलांची सक्रिय भूमिकाही आहे
पोषक आहाराबाबतच्या उणीवा दूर करायच्या असतील मुलांना कुपोषणापासून वाचवायचे असेल तर आपण फार मोठे योगदान देऊ शकताया बाबतही विचार करावा असा माझा तुम्हाला आग्रह आहेया कामासाठी आपण पुढाकार घेतला तर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करावे जी काही मदत लागेल ती करावी असा आग्रह मी भारत सरकार राज्यसरकारांना करेन एक चळवळ आपण उभारू शकतो
नववी दहावी अकरावी बारावीत शिकणाऱ्या मुलींना पोषक आहाराचे ज्ञान असेल तर परिवार सांभाळताना स्वयंपाकघरावर त्यांचाच पगडा असणार
आपण विचार करू शकता त्या किती मोठा बदल घडवून आणू शकतात
आपल्या माध्यमातून हे काम उत्तम साध्य होऊ शकतेम्हणूनच 2022 साठी एक संकल्प घेण्यासाठी मी आपल्याला निमंत्रित करतो
भारत सरकारने महिला सशक्तीकरणासाठी अनेक पाऊले उचलली आहेत
आईचे सानिध्य मोठी भूमिका बजावू शकते
जगात कदाचित दोन किंवा तीनच देश आहेत जे बाळंतपणाची रजा 26 आठवड्यापेक्षा जास्त देतात
जगातले समृद्ध आणि प्रगतिशील देशही 26 आठवड्यापेक्षा जास्त रजा देत नाहीत भारताने एवढा मोठा निर्णय घेतला आहे
कारण आमच्या माता भगिनींचे सशक्तीकरण देशाच्या सशक्तीकरणात नवी ऊर्जा नवी गती प्राप्त करून देऊ शकते आणि हा प्रवास सफल होण्याच्या दिशेने नेऊ शकते
सुकन्या समृद्धी योजना असू दे गर्भवती महिलांच्या बँक खात्यात तीन हप्त्यात 6000 रुपये जमा करण्याची योजना असू दे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना असू दे
उज्‍ज्‍वला योजने अंतर्गत एक मोठे अभियान चालवण्यात आले
आमच्या गरीब माताभगिनी चुलीत लाकडे पेटवून स्वयंपाक करत असत एक माता लाकडे वापरून चूल पेटवून स्वयंपाक करत असेल तर तिच्या शरीरात एका दिवसात 400 सिगारेटचा धूर जातो असे वैद्यक क्षेत्रातल्या लोकांचे म्हणणे आहे
मुले खेळत असतात त्यांनाही हा धूर सहन करावा लागतो
आपल्या माता भगिनींच्या तब्बेतीचे काय हाल होत असतील
भारत सरकारने आपल्या गरीब मातांची लाकडाचा वापर होणाऱ्या चुलीपासून सुटका करण्यासाठी पुढाकार घेतला
यासाठी एलपीजी गॅस सिलेंडर जोडणी देण्याचे मोठे अभियान हाती घेतले
गेले दहा महिने हे अभियान चालवण्यात येत आहे
आतापर्यंत सुमारे दोन कोटी गरीब कुटुंबाना गॅस सिलेंडर मिळाले आहेत लाकडाच्या चुलीपासून सुटका झाली आहे
तीन वर्षात 5 कोटी कुटुंबाना हे सिलेंडर पोहोचवण्याचा संकल्प आहे
आपली मातृ शक्ती महिला शक्तीला मदत कशी मिळेल यावर आमचा भर आहे
ब्रम्हकुमारी द्वारे यात मोठे योगदान मिळू शकते